गितांजली शेळकेंचे पाणलोट क्षेत्रातील कामाचे कौतूक करावे , तेवढे कमीच .- खा . आनंदराव आडसूळ .
गितांजली शेळकेंचे पाणलोट क्षेत्रातील कामाचे कौतूक करावे , तेवढे कमीच .- खा . आनंदराव आडसूळ .
पिंपरी जलसेन :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पिंपरी जलसेन मध्ये पाणलोट क्षेत्राचे झालेले काम पाहून जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांचे कौतूक करावे , तेवढे कमीच आहे , असे गौरवोद्गार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व खा . आनंदराव आडसूळ यांनी काढले आहेत .
यावेळी खा . आडसूळ पुढे म्हणाले की , पिंपरी जलसेन मध्ये पाणलोट क्षेत्राच्या कामाचा संकल्पना मांडली व ती गितांजली यांनी उचलून धरली . त्यामुळे पिंपरी जलसेन ला राज्य शासनाचा राज्य स्तरीय मानाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला , असे ही खा . आडसूळ म्हणाले .
खा . निलेश लंके यांनी गुलाबराव शेळके व संपूर्ण शेळके परिवाराचे कौतूक करून महानगर बँकेच्या वतीने पारनेर करांना मुंबईत आर्थिक ताकद देऊन आधार देण्याचे मोठे काम केल्याने आज खऱ्या अर्थाने पारनेरकर मुंबईत ताठ मानेने उभे आहेत . जलसेन नावातच पाणी असून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात . भर उन्हात उभे राहून त्यांनी पाणलोट क्षेत्राचे काम पूर्ण केले . त्याचबरोबर त्यांनी आजू बाजूच्या गावांनाही जोडण्याचे काम केले . यांची जी विकासात्मक कामे अपूर्ण आहेत , ती पूर्ण करून देण्याचाही शब्द खा . लंके यांनी दिला . तर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शेळके परिवाराचे योगदानाबद्दल गौरव केला .
प्रास्ताविक करताना जिल्हा सहकारी बँक व महानगर बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांनी पिंपरी जलसेन मध्ये पाणलोट क्षेत्राचे उर्वरित काम करताना येणाऱ्या अडचणी व उर्वरित कामांचा ऊहापोह केला . तर या कामामुळे येथील ग्रामस्थ उपजीविकेसाठी बाहेरगावी जात असे , ते थांबले व गावातील आपापल्या शेतातच राबवू लागल्याने शेतातील उत्पन्न वाढू लागले , गाव सुजलाम सुफलाम झाले . काम करताना मदतीचे अनेक हात पुढे आल्याने हे काम करता आले . अजून गावाची वीजेची समस्या कमी करण्यासाठी सोलर च्या माध्यमातून वीजेची समस्या सोडविण्याचा विचार बोलून दाखवला व गावा ला नजीकच्या काळात पाण्याची समस्या राहणार नाही , मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे , फक्त त्यासाठी पाणी मीटर द्वारे देण्याचा विचार ही गितांजली शेळके यांनी बोलून दाखवला .
यावेळी माजी आमदार डॉ . सुधीर तांबे , अशोक पवार , अशोक धात्रक , नगरसेवक रविंद्र इथापे , माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण , महानगर बँकेच्या संचालिका स्मिता शेळके यांनी मनोगत व्यक्त केले .
” उदय गुलाबराव शेळके फाऊन्डेशन जलसेन पुरस्कार २०२५ “, पारनेर तालुक्यातील विविध गावांमधून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पदा ला गवसणी घातलेले पळसपूर चे अभिजीत आहेर यांची केंद्रीय गुप्तचर अधिकारी , वडझिरेचे नवनाथ ढवळे पोलीस उपायुक्त , बाभूळवाडे चे मिलिंद जगदाळे उपजिल्हाधिकारी , वडझिरे चे गणेश दिघे उपजिल्हाधिकारी , लोणी मावळ्याचे वैभव पडवळ जिल्हा पोलीस उपधीक्षक , शिरापूरचे दीपक शेलार पोलीस उपाधीक्षक , सागर कदम पोलीस उपाधीक्षक , निघोजचे गौरव वांडेकर उपायुक्त , बाभूळवाडेचे राहुल जगदाळे सहाय्यक आयुक्त आरटीओ , दरोडी च्या प्रियंका पावडे दुय्यम निरीक्षक सातारा , पिंपरी जलसेनच्या प्रेरणा काळे सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर थोरात , सहायक पोलीस निरीक्षक दर्शन थोरात , सहाय्य पोलीस निरीक्षक अंकुश रणदिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक , निघोज च्या प्रियंका शेटे / कवाद सहायक पोलीस निरीक्षक , अमोल पडवळ व वैभव पडवळ , सुनिल सालके महसूल आयुक्त सुनील पवळे , अविनाश मावळे तलाठी , पारनेर तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार सौ निलम खोसे पाटील यांचा सन्मान चिन्ह , छत्रपती संभाजी महाराजां चे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला , तर पारनेर तालुक्यात पाणलोट क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे पानोली , काळकूप , भाळवणी , कासारे व नांदूर पठार या गावांना प्रतिष्ठेचा पुरस्काराचे मानपत्र , सन्मान चिन्ह व रोख ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले .
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू , सामाजिक कार्यकर्ते माधवराव देशमुख , महानगर बँकेच्या चेअरमन सुमनताई शेळके , व्हाईस चेअरमन भास्करराव कवाद , माजी व्हाईस चेअरमन सिताराम आडसूळ , प्रभाकर कवाद , लक्ष्मण गाजरे , सर्व संचालक , कर्मचारी , जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड , मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किसनराव पावडे सर , ज्ञानदेव लंके , उद्योजक मच्छिंद्र लंके, भानुदास खोसे , वसंतराव कवाद , प्राचार्य सहदेव आहेर , भाऊसाहेब आहेर , सुभाष बेलोटे , ठकाराम लंके , शिवाजीराव जाधव , शिवाजीराव औटी , विनोद फापाळे , सुभाष साठे , वसंतराव वांढेकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . पिंपरी जलसेन चे माजी सरपंच लहू थोरात यांनी आभार मानले .
यावेळी गितांजली शेळके यांच्या माध्यमातून पिंपरी जलसेन गावात झालेले पाणी आडवा , पाणी जिरवा योजनेतंर्गत बंधारे , चर , खड्डे या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत साठवून मुरल्याने विहीरींची पाणी पातळी वाढली , ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे अनुभव चित्रफिती द्वारे दाखविण्यात आले .
