ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला , कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला निघोज येथे हजेरी .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला , कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला निघोज येथे हजेरी .

 प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-

     साधारण ८ वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील कोपर्डीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला , नंतर तिच्या दुसऱ्या बहिणीच्या लग्नाला येण्याचे त्यावेळी तिचे वडिल बबनराव सुद्रिक यांना दिलेला शब्द नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निघोज येथे काल दुपारी लग्नाला अनपेक्षित हजेरी लावून पाळल्याचे दाखवून दिले .
पारनेर तालुका व शिरूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या टाकळी हाजी येथे या मुलीचे लग्न निघोज येथील वराळ परिवारातील मुलाशी ठरविण्यात आले . या मुलीच्या वडिलांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधारण ८ वर्षांपासून चे असणारे संबंध व मुख्यमंत्री फडणवीस हे पुर्ण फौज फाट्यासह या साध्या पद्धतीने झालेल्या लग्नाला अनपेक्षित उपस्थित राहून दिलेला शब्द पाळायचा असतो , हे दाखवून दिले व त्यांनी यावेळी लग्नाचे निमंत्रण दिल्याबद्द्ल व नूतम वधू , वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . या लग्न सोहळ्यासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर , माजी मंत्री राम शिंदे , माजी खा . डॉ . सुजय विखे पाटील , माजी आ . पोपटराव गावडे ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे , पारनेर तालुका अध्यक्ष राहूल शिंदे , संदीप पाटील जनसेवा फाऊन्डेशन चे अध्यक्ष सचिन वराळ , विलासराव हारदे , माजी नगराध्यक्ष विजय औटी व नगर , पुणे जिल्ह्यातील भाजपा चे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील कोपर्डी येथे साधारण ८ वर्षापूर्वी दि .१३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता , त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले , त्यामुळे राज्यभर या प्रकरणाने वातावरण तणावपूर्ण झाले होते . दि . २९ नोव्हेंबर २०१७ रोजी या प्रकरणातील आरोपींना पोलीसांनी अटक केली , सर्व साक्षी पुरावे पाहून न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली . हे प्रकरण आता वरच्या न्यायालयात सुनावणी साठी प्रलंबित आहे . यातील मुख्य आरोपीने दरम्यान च्या काळात तुरुंगातच आत्महत्या केली  . या प्रकरणातील अत्याचारीत कुटुंब ८ वर्षांपासून न्यायासाठी वण वण फिरत व पाठपुरावा करीत आहे . या प्रकरणाकडे मुख्यमंत्री फडणवीस व हे कुटुंब एकमेकांच्या संपर्कात होते , दरम्यान मध्यंतरच्या काळात वडिल बबनराव सुद्रिक यांनी दुसऱ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना दिले , पण विधानसभा निवडणूकीची धामधूम , त्यानंतर सत्तेचा सारीपाठ व त्यातून उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस , मुख्यमंत्री झाले , मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करून स्थिर स्थावर होता , होता , जुना शब्द आठवून लग्न समारंभाला तेही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज व पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी यांच्या सिमेवर असलेल्या कुंड पर्यटन स्थळावरील मंगल कार्यालयात आपल्या संपूर्ण लव्याजामासह तेही दोन्ही जिल्हयातील भाजपा नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर झाले , या लग्न सोहळ्यामध्ये माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगलआष्टका म्हणून वधु वरांना शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!